दहावी बोर्ड परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
अक्कलकोट प्रतिनीधी
वागदरी गावचे सामाजिक कार्यकर्ते श्री. सुनील माणिक सावंत यांच्या पुढाकाराने श्री. छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ वागदरीतर्फे दहावी बोर्ड परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न
वागदरी पंचक्रोशीतील नामांकित शिक्षण संस्था श्री.एस.एस. शेळके प्रशाला वागदरी येथे शिक्षण घेऊन सन २०२४.२५ या दहावी बोर्ड परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केलेल्या .कुमारी. शितल शिवराज पोमाजी (प्रशाले मध्ये द्वितीय क्रमांक व कन्नड विभाग मध्ये प्रथम क्रमांक) कुमारी. प्रतीक्षा सुभाष नंदे (तृतीय क्रमांक) कुमारी. समृद्धी सोन्याबापु शिरगापुरे(चतुर्थ क्रमांक) या गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार आपल्या वागदरी गावचे सामाजिक कार्यकर्ते श्री.सुनील सावंत यांच्या पुढाकाराने श्री.छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ वागदरी यांच्या तर्फे सकल मराठा समाज वागदरीचे अध्यक्ष श्री. प्रदीप पाटील सर , गोगांवचे उपसरपंच कमलाकर सोनकांबळे, वागदरी गावचे माजी तंटामुक्त अध्यक्ष श्री. राजकुमार यादव यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व मानाचा फेटा बांधून आपल्या गावचे सामाजिक कार्यकर्ते श्री.शिवराज पोमाजी यांच्या घरामध्ये करण्यात आले. प्रास्ताविक पर भाषण करताना राज्य परिवहन महामंडळ मध्ये वाहक पदावर कार्यरत असलेले श्री.मारुती शिंदे यांनी म्हणाले की, जीवनामध्ये शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. माणूस हा पैशाने किती श्रीमंत आहे? तो संपत्तीने किती श्रीमंत आहे ?यापेक्षा तो विचाराने किती समृद्ध आहे हे महत्त्वाचे आहे. आपले जे महापुरुष घडले ते केवळ शिक्षक आणि आपल्या आई-वडिलांच्या संस्कारातून घडले. त्यामुळे आज जर जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर आपल्या विद्यार्थ्यांवरती शिक्षकांचे संस्कार आणि आपल्या मुलांवरती आई वडिलांचे संस्कार असणे महत्त्वाचे आहे. शिक्षणातूनच श्रीमंतीचा दरवाजा खुला होतो आणि समृद्ध शिक्षणातूनच संस्कारक्षम देश घडत असतो. आपली स्वतःची परिस्थिती कितीही गरीब असू दे,पण पालक या नात्याने आपल्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्यासाठी आपण मनापासून प्रयत्न केला पाहिजे. आत्ता आपण जे शालांत परीक्षेमध्ये उज्वल यश मिळवले आहे,तीच परंपरा पुढे कायम राखून आपल्या परिवाराच्या श्रीमंतीसह समाजातील निराधारांना आधार आपण झाले पाहिजे अशी अपेक्षा श्री. मारुती शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. या सत्कार समारंभाचा उद्देश म्हणजे आजच्या सत्कारमूर्तीना भविष्यातील जबाबदारीची जाणीव आणि नवोदित विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याच्या उद्देशाने करण्यात आला.
या सत्कार समारंभ प्रसंगी श्री. छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळाचे अध्यक्ष श्री.राजभाऊ शिंदे, गोगाव गावचे विद्यमान उपसरपंच श्री. कमलाकर सोनकांबळे, श्री. महादेव सोनकवडे, श्री. संतोष पोमाजी, श्री. प्रकाश सी.पोमाजी,श्री. सोन्याबापू शिरगापुरे,श्री. शिवराज पोमाजी, श्री. वीरभद्र पुरांत, श्री.गोपी सावंत, श्री. परमेश्वर वि. सावंत, श्री. राम मोरे, श्री. रोहित शिंदे, श्री. अभिजीत सावंत, श्री. मधुकर सावंत , श्री. आकाश कणसे यासह श्री छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ वाघदरीचे कार्यकर्ते व गावकरी बांधव उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्वांनी आपल्या या उज्वल यश संपादन केलेल्या मुलींना पुढील शैक्षणिक जीवनासाठी भरभरून शुभेच्छा दिले. अशाप्रकारे अतिशय उत्साही वातावरणामध्ये या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी श्री. शिवराज पोमाजी परिवाराने सर्व पाहुण्यांचा यथोचित पाहुणचार केला…